Sunday, August 4, 2013 | By: Unknown

मैत्री





आपले आई-वडील कोण असावेत हे आपण ठरवू शकत नाही.पण आपले मित्र कोण असावेत हे मात्र आपल्या हातात असते.
मैत्री हि अशा गोष्टींपैकी  आहे की जिच्याशिवाय हे आयुष्य व्यर्थ भासते .
दोन मुलं ,दोन मुली अथवा १ मुलगा -१ मुलगी मित्र असोत , हे एक असं नातं आहे जे प्रत्येकासाठी आधाराचं काम करतं.टेन्शन तर आज प्रत्येकाच्या आयुष्यात आहे . पण ते बिनधास्तपणे शेअर करण्यासाठी मित्र ज्यांच्याकडे आहेत त्याचं निम्मं टेन्शन तिथेच दूर होतं.

माझ्या प्रत्येक मित्रासाठी हा पोस्ट आहे .माझे नालायक मित्र जे मला आवडणाऱ्या मुलीसामोरच माझी भंकस करतात तरीही  नेहमी काहीतरी जुगाड करून आपला काम फिट करतात  त्याच हलकट मित्रांसाठी हा पोस्ट.त्यांच्या या नालायकपणातच दडलंय माझ्याबद्दलच प्रेम.आजारी पडल्यावर शिव्या घालणाऱ्या सर्व काळजीवाहू मित्रांसाठी हा पोस्ट . आजारी पडल्यावर स्वताच्या assignments न लिहिता माझ्या assignments  पूर्ण करणाऱ्या अतरंगी मित्रांसाठी हा पोस्ट.माझ्या मैत्रिणींसाठी हा पोस्ट ज्या सदैव अभ्यास आणि भंकस यांचा तोल ठेवायला बजावत असतात.
माझा खास दोस्त जो सध्या दूर आहे परंतु तेवढाच connected आहे त्याच्यासाठी हा पोस्ट.
माझी खास मैत्रीण जी चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्यासोबत प्रत्यक्ष असते तिच्यासाठीदेखील 
माझ्या सर्व सर्व दोस्तांसाठी.
I thank god that he introduced us in somewhat freakiest style.Life would have been difficult without u guys!!! Thanks for being my friend!




मैत्री

जिथे बोलण्यासाठी शब्दांची " गरज नसते,
आनंद  दाखवायला "हास्याची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवांची  " गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ती म्हणजे " मैत्री "

जो रक्ताची नातीच काय पण परक्याला पण खेचून आणतो
आपल्या ही मनाला तो जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो
हीच मैत्री .......तो विश्वाचा एक धागा असतो

जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री.......... 



Wednesday, May 1, 2013 | By: Unknown

महाराष्ट्र दीन

.महाराष्ट्र  दिनाच्या पूर्वसंध्येला आपला इतिहास आलं नजरेसमोर .. आणि वर्तमान सुद्धा....  पश्चाताप झाला .. काय आपला इतिहास आणि कसा वर्तमान ?? भविष्याच तर विचारायलाच  नको . कधी कधी वाटतं कि १०५ मराठी शहिदांच रक्त वाया गेलंय आणि जातंय. महाराष्ट्र दिनाच्या छान दिवशी असा विचार करणं वगैरे काहींना  खटकेल पण त्याला नाईलाज आहे . करणं सभोवताली जे चालू आहे ते खरच पाहवत नाहीये..त्याहून जास्त त्रास होतोय तो हतबलतेचा ... सामान्य माणूस एकटा पडलाय आणि पाहतोय सगळं. पण पोटाची खळगी भरण्याच्या चिंतेपुढे तो हतबल आहे .. काहीच करू शकत नाही अशी अवस्था आहे .. भले कोणी म्हणेल योग्य मत द्या आणि तुमचा हक्क घ्या .. अहो पण इथे उमेदवारच नाहीत योग्यतेचे.. त्याच काय ??
                    काळानुसार सामाजिक प्रग्लाभता येण्याऐवजी मराठी समाज रसातळाला जातोय ... संपूर्ण महाराष्ट्र दारूत नासतोय. अक्कलशुन्य पैसेवाले चालवत आहेत राज्य आज .. थोडेफार असतील नग चांगले पण गाव आणि शहर पातळीवर तर बोलण्याची पण सोय नाही .. ठाणे जिल्हा पहा जर म्हणजे एक सणसणीत चपराक बसेल .. अहो इतकंच काय , आमच्या बदलापुरातले so called  नेतेलोग बघा ..  २-४ सोडले तर बाकीचा सर्व "लई झ्याक्क" कारभार आहे ... जर असे जनतेच नेतृत्व (?) करत असतील तर मग सगळं राम भरोसे.  संतांच्या देशात पूर्वी अमृतवाणीचा पूर असे .. आता त्याच देशात पाणी नाही पण मुबलक दारू आहे ... वा!! क्या बात!! 
                 












आज आपल्याकडे सरळ सरळ जातीनिहाय वर्ग पडलेत ..  बाबासाहेब हे केवळ त्यांचेच या आविर्भावात दलित आहेत.. त्यांनी सांगितलेला मार्ग सोडून भलत्याच मार्गावर चालताहेत .. वरून आम्ही बाबांच्या मार्गावर चालत आहोत हा अभिमान (?)  अहो जर बघा डोळे उघडून नीट!!! दुसरीकडे obc बांधव लागलेत मागे आरक्षणाच्या !!  आरक्षणामुळे पडलेली दुफळी कमी होती कि काय कि मागच्या काही वर्षात हे संभाजी बिग्रेडी वाले अजून विष पसरवण्याच काम करताहेत ... अरे नाव काय .. तुमचा कार्य (?) काय ? secularism बोलायचं आणि ब्राम्हण - मराठा - बहुजन यांच्यात लावून द्यायची आग ?? आणि तो पुरषोत्तम(?) खेडेकर.. स्वताचा इतिहास लिहितोय . च्या मारी हे बांडगुळ आता फेकून द्यायची वेळ आहे मित्रांनो..
आज जर टिळक , आगरकर , फुले , सावरकर , रानडे , आंबेडकर असते तर हि अवस्था पाहून नकीच ते नाराज झाले असते... प्रकाशाकडून अंधाराकडे असं आपला प्रवास आहे .. होय .!! दुर्दैवाने हे म्हणव लागेल ... 
विकासाबाबत तर काही न बोलेलच बरं... अजून खूप लिहाव लागेल पण ते संपणार नाही .. असो .. लेख संपवावा लागेल थोडक्यात!! 
 आजच्या पिढीच्या हातात आहे ... आपला भविष्यकाळ आणि पर्यायाने महराष्ट्राचा... संघटीत झालो आपण आज तरच आहे आपला टिकाव हे लक्षात नाही आलं आपल्या तर काही खर नाही .
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एवढं वास्तवभान आलं म्हणजे मिळवलं.

जाता जाता हा video बघा !! थोडं बर वाटेल


।।श्री स्वामी समर्थ।।