Wednesday 1 May 2013 | By: Ninad Pethkar

महाराष्ट्र दीन

.महाराष्ट्र  दिनाच्या पूर्वसंध्येला आपला इतिहास आलं नजरेसमोर .. आणि वर्तमान सुद्धा....  पश्चाताप झाला .. काय आपला इतिहास आणि कसा वर्तमान ?? भविष्याच तर विचारायलाच  नको . कधी कधी वाटतं कि १०५ मराठी शहिदांच रक्त वाया गेलंय आणि जातंय. महाराष्ट्र दिनाच्या छान दिवशी असा विचार करणं वगैरे काहींना  खटकेल पण त्याला नाईलाज आहे . करणं सभोवताली जे चालू आहे ते खरच पाहवत नाहीये..त्याहून जास्त त्रास होतोय तो हतबलतेचा ... सामान्य माणूस एकटा पडलाय आणि पाहतोय सगळं. पण पोटाची खळगी भरण्याच्या चिंतेपुढे तो हतबल आहे .. काहीच करू शकत नाही अशी अवस्था आहे .. भले कोणी म्हणेल योग्य मत द्या आणि तुमचा हक्क घ्या .. अहो पण इथे उमेदवारच नाहीत योग्यतेचे.. त्याच काय ??
                    काळानुसार सामाजिक प्रग्लाभता येण्याऐवजी मराठी समाज रसातळाला जातोय ... संपूर्ण महाराष्ट्र दारूत नासतोय. अक्कलशुन्य पैसेवाले चालवत आहेत राज्य आज .. थोडेफार असतील नग चांगले पण गाव आणि शहर पातळीवर तर बोलण्याची पण सोय नाही .. ठाणे जिल्हा पहा जर म्हणजे एक सणसणीत चपराक बसेल .. अहो इतकंच काय , आमच्या बदलापुरातले so called  नेतेलोग बघा ..  २-४ सोडले तर बाकीचा सर्व "लई झ्याक्क" कारभार आहे ... जर असे जनतेच नेतृत्व (?) करत असतील तर मग सगळं राम भरोसे.  संतांच्या देशात पूर्वी अमृतवाणीचा पूर असे .. आता त्याच देशात पाणी नाही पण मुबलक दारू आहे ... वा!! क्या बात!! 
                 












आज आपल्याकडे सरळ सरळ जातीनिहाय वर्ग पडलेत ..  बाबासाहेब हे केवळ त्यांचेच या आविर्भावात दलित आहेत.. त्यांनी सांगितलेला मार्ग सोडून भलत्याच मार्गावर चालताहेत .. वरून आम्ही बाबांच्या मार्गावर चालत आहोत हा अभिमान (?)  अहो जर बघा डोळे उघडून नीट!!! दुसरीकडे obc बांधव लागलेत मागे आरक्षणाच्या !!  आरक्षणामुळे पडलेली दुफळी कमी होती कि काय कि मागच्या काही वर्षात हे संभाजी बिग्रेडी वाले अजून विष पसरवण्याच काम करताहेत ... अरे नाव काय .. तुमचा कार्य (?) काय ? secularism बोलायचं आणि ब्राम्हण - मराठा - बहुजन यांच्यात लावून द्यायची आग ?? आणि तो पुरषोत्तम(?) खेडेकर.. स्वताचा इतिहास लिहितोय . च्या मारी हे बांडगुळ आता फेकून द्यायची वेळ आहे मित्रांनो..
आज जर टिळक , आगरकर , फुले , सावरकर , रानडे , आंबेडकर असते तर हि अवस्था पाहून नकीच ते नाराज झाले असते... प्रकाशाकडून अंधाराकडे असं आपला प्रवास आहे .. होय .!! दुर्दैवाने हे म्हणव लागेल ... 
विकासाबाबत तर काही न बोलेलच बरं... अजून खूप लिहाव लागेल पण ते संपणार नाही .. असो .. लेख संपवावा लागेल थोडक्यात!! 
 आजच्या पिढीच्या हातात आहे ... आपला भविष्यकाळ आणि पर्यायाने महराष्ट्राचा... संघटीत झालो आपण आज तरच आहे आपला टिकाव हे लक्षात नाही आलं आपल्या तर काही खर नाही .
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एवढं वास्तवभान आलं म्हणजे मिळवलं.

जाता जाता हा video बघा !! थोडं बर वाटेल


Tuesday 23 April 2013 | By: Ninad Pethkar

मी टिळा का लावतो ??


मी टिळा का लावतो ?? टिळा लावून गेलो कि कॉलेज मध्ये नेहमी मला "राज" सारखा दिसतोस , एकदम वास्तव style बनून आला आहेस असं बोलतात .. पण मी कधी उत्तर देत नाही त्यावर .... हे जरूर वाचा.. पटल तर तुम्ही पण सामील व्हा !


हिंदू टिळा का लावतात...??

उत्तर - हिंदु अध्यात्म ची खरी ओळख टिळा(तिलक) ने होते. टिळा लावल्याने
समाजामध्ये मान-सन्मान ने पाहतात. हिंदु धर्मात प्रत्येक शुभ कार्यात टिळा
लावणे हि प्रथा आहे. टिळा अनेक वस्तू आणि पदार्थाचे असतो.

उदा. हळदी,कुंकू,केशर,भस्म आणि चंदन हे प्रमुख आहे.
पण तुम्हाला माहित आहे टिळा लावण्या मागे काय भावना असते...??
पुराणामध्ये असे लिहिलेले आहे कि,संगमाच्या किनार्यावर "गंगा स्नान" केल्यानंतर
साधू\पंडित द्वारे टिळा लावल्यास मोक्ष प्राप्ती होते.कपाळावर टिळा लावण्यामागे आध्यात्मिक
महत्व आहे.आपल्या शरीरात सात (७) सुश्मउर्जा केंद्र आहे.जे अपार शक्ती चे भांडार आहे.
यांना "चक्र" असे म्हणतात.कपाळाच्या मध्ये जिथे आपण टिळा लावतो,तिथे आज्ञाचक्र असतो.
हा चक्र आपल्या शरीराचा सगळ्यात महत्वपूर्ण स्थान आहे.इथे आपल्या शरीराच्या प्रमुख तीन
नाड्या

१) इडा २)पिंगला आणि ३)सुष्मना येउन मिळतात म्हणून याला "त्रिवेणी" किवा "संगम" पण
म्हणतात.

हे गुरु स्थान आहे.इथूनच पूर्ण शरीर संचालन होते.हे आपल्या चेतनाचे मुख्य स्थान पण
आहे.याला मनाचे घर पण म्हणतात.यामुळे हे स्थान पूर्ण शरीरात सगळ्यात जास्त पूजनीय आहे.
योग मध्ये ध्यान करता वेळी याच ठिकाणी मन एकाग्र केले जाते.टिळा लावल्याने स्वभावात चांगले
बदल घडून येतात व पाहणार्याचे सात्विक प्रभाव आपल्यावर पडतो.टिळा काही खास प्रयोजना साठी
पण लावतात. जसे मोक्षप्राप्ती करायची असेल तर टिळा अंगठ्याने..शत्रू चा नाश करायचा असेल तर
तर्जनी ने,धनप्राप्ती हेतू मध्यमा नी आणि शांती प्राप्ती साठी अनामिका नि टिळा लावला जातो.

साधारणत : टिळा अनामिका द्वारे लावला जातो. आणि त्याच्यात पण चंदनाचे लावला जातो.
तिळ्यासह तांदूळ लावल्यास आई लक्ष्मी आकर्षित होते व थंडक व सात्विकता प्रदान करण्याचा निमित्त
लपलेले असते.म्हणून प्रत्येक हिंदूने टिळा जरूर लावावा.हिंदु प्रथेप्रमाणे टिळा न लावणे अशुभ आहे.

टिळा हिंदु संस्कृती ची ओळख आहे.टिळा लावणे हे फक्त धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारण पण आहे
।।श्री स्वामी समर्थ।।