Monday, July 2, 2012 | By: Unknown

शिल्लक केवळ अंधार






Oxygen...प्राणवायू ... जगण्यासाठी अत्यावश्शक...
पण जर ठिणगी उडाली अन आग लागली तर त्या आगीला धगधगत ठेवणारा सुद्धा हाच Oxygen...
भावनाप्रधान माणसांच्या मनाचं देखील काही असंच असतं...
जोपर्यंत त्यांची मन जपली जातात ना तोपर्यंत ते समोरच्याची जीवापाड काळजी घेतात... पण एकदा का त्यांची मन दुखावली गेली की मग आग लागते... ती क्वचितच दुसऱ्यांना जाळते.. बहुतेक वेळेस ती भावनाप्रधान व्यक्ती स्वतःच जळत राहते....समोरच्याला  काय वाटेल याकडे लक्ष देता देता स्वतःच मन मारते 
                    
भावनाप्रधान माणसांच Oxygen म्हणजे  'किंमत' आणि प्रेम.. त्यावरच ते जगतात...
पण जेंव्हा त्यांची किंमत केली जात नाही तेंव्हा हाच Oxygen त्यांच्या मनातल्या आगीला धगधगत ठेवतो...

आणि मग मागे उरतं ते फक्त जळक मन आणि एकाकीपणाचा अथांग समुद्र 
।।श्री स्वामी समर्थ।।